अहमदनगर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Ahmednagar Information In Marathi

Ahmednagar Information In Marathi अहमदनगर हे महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे. हे सीना नदीच्या डाव्या बाजूला वसलेले आहे. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रात सर्वांत जास्त क्षेत्रफळ असलेला जिल्हा, सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला, आणि सर्वाधिक सहकारी साखर कारखाने असलेला राज्यातील जिल्हा म्हणून ओळखला जातो. तर चला मग पाहूया अहमदनगर या जिल्ह्याविषयी विस्तृत माहिती.

Ahmednagar Information In Marathi

अहमदनगर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Ahmednagar Information In Marathi

क्षेत्रफळ व विस्तार :

अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ 17,412 चौ.कि.मी. तर लोकसंख्या 2011 च्या जनगननुसार 45,43,080 इतकी आहे. मुख्य भाषा ही मराठी आहे.

राज्याच्या मध्यभागी असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक जिल्हा व औरंगाबाद जिल्हे, पूर्वेस बीड जिल्हा, पूर्व व आग्नेय दिशांस उस्मानाबाद जिल्हा, दक्षिणेस सोलापूर जिल्हा, तर नैर्ऋत्येस व पश्चिमेस पुणे जिल्हा व ठाणे जिल्हा हे जिल्हे वसलेले आहेत.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात सर्वांत मोठा असणाऱ्या या जिल्ह्याने राज्याचे 5.54% भौगोलिक क्षेत्र व्यापलेले आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील प्रामुख्याने अकोले तालुका व संगमनेर तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत.

हवामान :

अहमदनगर जिल्ह्याचे हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. पश्चिमेकडील डोंगराळ भागात हवामान थंड आहे. जिल्ह्यात रोजच्या कमाल व किमान तापमानातील तफावत पाहता ती लक्षणीयरीत्या जास्त असल्याचे आढळते. जिल्ह्यात पश्चिमेकडून पूर्वेकडे पाऊस कमी कमी होत जातो. प्रामुख्याने जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग अवर्षणग्रस्त आहे.

प्रमुख नद्या :

जिल्ह्याचा मध्य भाग हा बाळेश्वराचे पठार या नावाने संबोधला जातो. उत्तरेकडे गोदावरी नदीचे खोरे आहे तर दक्षिण भाग हा घोड, भीमा व सीना या नद्यांचे खोरे म्हणून ओळखला जातो.

गोदावरी,  भीमा, सीना, मुळा व प्रवरा या अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून आढळा, घोड, कुकडी या नद्या जिल्ह्यातून वाहतात. बहुतांशी नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात.  गोदावरी या महाराष्ट्रातील प्रमुख नदीची जिल्ह्यातील लांबी सुमारे 150 कि.मी. आहे. प्रवरा व गोदावरी नद्यांचा संगम नेवासे तालुक्यात प्रवरासंगम येथे होतो.

अहमदनगरचा इतिहास :

या जिल्ह्याच्या नावावरूनच पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या निजामशाही व मोगल साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते. रामायणकाळात अगस्ती ऋषींनी विंध्य पर्वत ओलांडून गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसाहत स्थापन केल्याचे आणि त्यांची व श्रीरामाची भेट झाल्याचे मानले जाते.

आणखी महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली मानवी वसाहत याच जिल्ह्यात प्रवरा व गोदावरी नद्यांच्या किनाऱ्यावर झाली, असा निष्कर्ष पुण्याच्या डेक्कन कॉलेजने नेवासातील उत्खननानंतर काढला आहे. भारतीय पुरातत्व विभागाने श्रीरामपूर तालुक्यातील दायमाबाद येथे केलेल्या उत्खननातून या जिल्ह्यात सिंधु संस्कृतीचे अस्तित्व सिद्ध झालेले आहे.

निजामशाहीच्या पडत्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी छोट्या मूर्तझा निजामशहाला मांडीवर घेऊन नगरचा कारभार पाहिला. पुढे काही काळ नगरने मराठेशाही व शहाजहान बादशहाची मोगलशाही अनुभवली.

1759 मध्ये नगर पेशव्यांकडे आले आणि 1803 मध्ये ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. 1818 पासून अहमदनगरवर पूर्णपणे इंग्रजांचा अंमल होता. 1822 मध्ये ब्रिटिशांनी अहमदनगर जिल्ह्याची स्थापना केली.

इ.स. 1942 चे चलेजाव आंदोलन:

इ.स. 1942 च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात.

तालुके :

अहमदनगर जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत.
अहमदनगर, अकोले, जामखेड, कर्जत, कोपरगांव, नेवासा, पारनेर, पाथर्डी, राहाता, राहुरी, संगमनेर, शेवगांव, श्रीगोंदा, श्रीरामपुर.

वाहतूक :

जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्र. 50) जातो. तसेच कल्याण-विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग 222 पारनेर, नगर, पाथर्डी या तालुक्यांतून जातो.

पुणे-औरंगाबाद हा जिल्ह्यातून जाणारा महत्त्वाचा राज्यमार्ग असून अहमदनगरला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात सर्वप्रथम (1948 मध्ये) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस धावली ती अहमदनगर-पुणे या मार्गावर. अहमदनगर रेल्वे स्थानक हे दौंड-मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे.

197 कि.मी. चा रेल्वे मार्ग जिल्ह्यात असून अहमदनगर-बीड-परळी आणि पुणतांबा-शिर्डी रेल्वे मार्ग आहे. संगमनेरहून रंधा धबधब्याकडे जाताना लागणारा विठे घाट व संगमनेरहून पुण्याकडे जाताना लागणारा चंदनापुरी घाट हे नगर जिल्ह्यातील महत्त्वाचे घाट आहेत.

वनस्पती :

अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिम डोंगराळ भागात जंगले आहेत. जंगलात सागवान, बाबुल, धावडा, हलडू, कडुनिंबाची झाडे आहेत. जिल्ह्यात आंबा, चिंच, आवळा, बोर ही फळझाडेही आढळतात.

शेती :

ज्वारी हे नगर जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ते दोन्ही हंगामांत घेतले जाते. ऊस हे देखील महत्त्वाचे पीक असून जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या जास्त आहे.

अलीकडच्या काळात, जिल्ह्यात द्राक्ष, मोसंबी, डाळिंब या फळांचे तसेच सूर्यफुलाचे क्षेत्र व उत्पादन वाढते आहे. जिल्ह्यातील शेवंतीची फुलेही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. राज्याबाहेरही शेवंतीला मागणी असते. जिल्ह्यात श्रीरामपूर येथे मोसंबी संशोधन केंद्र आहे.

इतर उद्योग :

अहमदनगर मध्ये अनेक लघु व मोठ्या उद्योगांची उपस्थिती आहे. छोट्या उद्योगांमध्ये अशा उद्योगांचा समावेश आहे जिथे धान्य त्यांच्या कडकडाटापासून विभक्त झाले आहे, औषधी वनस्पती गोळा करणे, बिडी गुंडाळणे, गूळ बनविणे इ. मोठ्या प्रमाणात उद्योग  ‘आयुर्वेदिक’ औषध तयार करण्यात गुंतले आहेत.

अहमदनगरमधील अन्य मोठ्या प्रमाणात उद्योग मोपेड आणि टीव्ही सेट्स तयार करतात. इंजिन आणि पंप सेट तयार करणे, औषधी कारखाने, साखर कारखाने असे मोठे उद्योग आहेत. अहमदनगर येथेही सूत गिरण्या, जिनिंग आणि प्रेसिंग उद्योग आहेत.

राजकीय संरचना :

अहमदनगर जिल्ह्यात 2 लोकसभा मतदारसंघ असून 12 विधानसभा मतदारसंघ आहेत. हा मतदारसंघ अहमदनगर शहर, कर्जत-जामखेड, पारनेर, राहुरी, शेवगाव व श्रीगोंदा या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे.

शिर्डी हा 2009 पासून अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला लोकसभा मतदारसंघ श्रीरामपूर, शिर्डी, अकोले, संगमनेर, कोपरगाव, नेवासा या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे. तसेच जिल्ह्यात 75 अहमदनगर जिल्हा परिषद मतदारसंघ असून, 150 पंचायत समिती मतदारसंघ आहेत.

पर्यटन स्थळ :

कोकमठाण :

विश्वात्मक जंगलीदास महाराज आश्रम

पुणतांबा :

गोदावरी नदीच्या तीरावरील प्राचीन तीर्थक्षेत्र. संत चांगदेव महाराजांची समाधी.

मढी :

श्री कानिफनाथ समाधी मंदिर

साकुरी :

सदगुरू उपासनी महाराज आश्रम

राळेगणसिद्धी व हिवरे बाजार :

संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेली आदर्श गावे.

दायमाबाद :

पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ.

भुईकोट किल्ला, अहमदनगर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्तंभ, चोंडी धर्मवीरगड. चांदबीबी चा महल, भंडारदरा, माळढोक आणि रेहकुरी अभयारण्य ही पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र आहेत.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करू नक्की सांगा व इतरांसाठी शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

FAQ

अहमदनगर का प्रसिद्ध आहे?

अहमदनगर हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. येथे 19 साखर कारखाने आहेत आणि सहकार चळवळीचे जन्मस्थान देखील आहे. साखर, दूध आणि बँक सहकारी येथे भरभराटीला येतात.

अहमदनगर जिल्हा का महत्त्वाचा आहे?

अहमदनगर जिल्ह्याची आजही सहकार क्षेत्रात अग्रेसर अशी ओळख आहे. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथे 1950 साली स्थापन झाला.

अहमदनगरची प्रसिद्ध डिश कोणती आहे?

अहमदनगरमध्ये स्ट्रीट फूड संस्कृतीही चांगली आहे. वडा पाव, बटाटा भजी, कांदा भजी आणि मिसळ पाव यासारखे सर्व लोकप्रिय महाराष्ट्रीयन फास्ट फूड रस्त्यावर विक्रेत्यांच्या टोळ्यांद्वारे विकले जातात. मात्र, इथे क्वचितच पाणीपुरी आणि भेळ पुरीचा स्टॉल मिळेल.

अहमदनगरची संस्कृती काय आहे?

अहमदनगरच्या बहुसंख्य लोकसंख्येमध्ये हिंदू नक्कीच आहेत, परंतु या शहरात मुस्लिमांचीही मोठी उपस्थिती आहे. खरे तर इस्लाम हा सर्वात मोठा अल्पसंख्याक धर्म असून त्यानंतर ख्रिश्चन आणि शीख धर्मीय आहेत.

अहमदनगरमध्ये कोणते फळ प्रसिद्ध आहे?

पेरूची फळे

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment