औरंगाबाद जिल्ह्याची संपूर्ण माहिती Aurangabad District Information In Marathi

Aurangabad District Information In Marathi महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळख असलेला जिल्हा म्हणजे औरंगाबाद. या जिल्ह्यामध्ये एकापेक्षा एक पर्यटनस्थळं आहेत. ऐतिहासिक ठेवा आणि भविष्याचा वेध असलेला हा जिल्हा आहे. औरंगाबाद जिल्हा म्हटलं की वेरुळ-अजिंठा, बिबी का मकबरा आशी दोन-तीन पर्यटनस्थळं आपल्या नजरेसमोर येतात.  या व्यतिरिक्तही बर्‍याच गोष्टी आपण या जिल्ह्याविषयी विस्तृत माहिती जाणून घेऊया.

Aurangabad District Information In Marathi

औरंगाबाद जिल्ह्याची संपूर्ण माहिती Aurangabad District Information In Marathi

क्षेत्रफळ व विस्तार :

जिल्ह्याचे क्षेत्रफळ 10,100 चौ.कि.मी असून लोकसंख्या 37,01,282 इतकी आहे. त्यापैकी 141.1 चौ. कि.मी. शहरी तर 9587 चौ. कि.मी. ग्रामीण क्षेत्र आहे. या जिल्ह्याला मोठा सांस्कृतिक वारसा आहे. येथे मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या भाषा बोलल्या जातात.

शहर चारही बाजूनीं टेकड्या आणि डोंगरांनी वेढलेले आहे. उत्तरेकडून दक्षिण- नैर्ऋत्येस वाहात जातात. शहराच्या उत्तरेस डोंगररांग आहे. दक्षिणेसही डोंगर आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात मध्यम ते भारी स्वरूपाची काळी मृदा आहे जिच्यामध्ये कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमचे प्रमाण अधिक आढळून येते.

हवामान :

औरंगाबादचे वार्षिक तापमान 9° ते 40° दरम्यान असते. शहराला भेट देण्याचा आल्हाददायक काळ हा हिवाळ्यात, ऑक्टोबर ते मार्च दरम्यान आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात पडत असलेल्या पावसापैकी सर्वाधिक पाऊस जून ते सप्टेंबर या काळात पडतो. साधारणपणे 9.0 ते 693 मिलीमीटर/महिना हे पावसाचे प्रमाण असते. सरासरी वार्षिक पर्जन्यमान हे 725 मिलीमीटर असते.

जिल्ह्यातील तालुके :

खुलताबाद तालुका, औरंगाबाद, सोयगांव तालुका, सिल्लोड तालुका, गंगापुर तालुका, कन्नड तालुका, फुलंब्री तालुका, पैठण तालुका, वैजापूर तालुका.

औरंगाबाद जिल्ह्याचा इतिहास :

औरंगाबाद शहराच्या निर्मितीचा इतिहास मोठा रंजक आहे. हे शहर 1610 मध्ये निजामशाहाचा सरदार मलिक अंबर याने वसवले. या शहराला 52 दरवाजांचे शहर म्हटले जाते.

या शहराला पूर्वी खडकी असं म्हटलं जायचं. मुघल बादशाहा औरंगजेबाने आपली राजधानी औरंगाबादला आणली तेव्हा या शहरात अनेक बदल करण्यात आले. औरंगजेबाने त्याच्या राजधानीचे संरक्षण व्हावे म्हणून 54 रस्ते भिंतीच्या साहाय्याने जोडले.

तसेच सन 1682 मध्ये मराठ्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून मोठी भिंत बांधली गेली. तसेच पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून 14 नहरी बांधल्या गेल्या. विशेष म्हणजे औरंगजेब त्याच्या मृत्यूपर्यंत औरंगाबाद शहरातच राहिला.

17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद निजामांपासून मुक्त झाले. त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाडा तत्कालीन बॉम्बे राज्यात विलीन करण्यात आला. त्यानंतर औरंगाबादची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. या जिल्ह्यातील इतिहासाची संस्कृती व संस्कृतीचे रुपांतर करण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका होती.

हे गहन सामाजिक-राजकीय कामकाज, शिकविण्याचे संच, धार्मिक चळवळींचे केंद्रस्थान होते. इतिहासाच्या लांब आणि अटकावलेल्या काळात त्यांनी कला, वास्तुकला, शिल्पकला, पेंटिंग, पोषाख, दागिने, खाद्यपदार्थ आणि भाषा इत्यादिचे योगदान दिले आहे.

पैठण, देवगिरी, औरंगाबाद, अजिंठा, एलोरा सारख्या केंद्रे मोठ्या संख्येने संत, कवी, पुरुष आणि साहित्य आणि संपूर्ण देशभरातील कारागीर. म्हणूनच, धर्मांबरोबर विविध जीवनशैलीचे एक सभास्थान राहिले. म्हणूनच जिल्ह्यात पर्यटकांनी आपल्या प्राचीन आणि मध्ययुगीन धर्मातील प्रेक्षकांना भेट दिली.

वाहतूक मार्ग :

औरंगाबाद महाराष्ट्र आणि इतर राज्यांत विविध प्रमुख शहरे रस्त्यांनी जोडले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 हा शहरातूनच जातो. जालना, पुणे, अहमदनगर, नांदेड, नागपूर, बीड आणि मुंबई ही शहरे रस्त्याने जोडलेली आहेत आणि हा मार्ग सध्या राष्ट्रीय महामार्ग मानक चार लेन रोड मध्ये बदलविल्या जात आहे.

नवीन नागपूर-औरंगाबाद- मुंबई एक्सप्रेस हायवे देखील विकसित केला जात आहे. औरंगाबाद येथून शिर्डी येथे जाता येते, रस्ताने हे अंतर 85 कि.मी. एवढे आहे.

हे दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या सिकंदराबाद-मनमाड ब्रॉ़डगेज लोहमार्गावर असलेले एक रेल्वे-स्थानक आहे. औरंगाबाद पासून नांदेड, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, शिर्डी, नागपूर, नाशिक, पुणे, अमृतसर, अंबाला, निझामाबाद, कुर्नुल, रेनिगुंटा, विशाखापट्टनम्, इरोडे, मदुराई, भोपाळ, ग्वालियर, वडोदरा, चेन्नई, तिरुपती, रामेश्वरम, अहमदाबाद आणि राजकोटपर्यंत रेल्वे-सेवा उपलब्ध आहे.

औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ हे चिकलठाणा येथे स्थित आहे. येथून हैदराबाद, दिल्ली, उदैपूर, मुंबई, जयपूर, पुणे आणि नागपूर साठी विमान सेवा उपलब्ध आहे. 2008 पासून हज्ज यात्रा साठी विमान सेवा उपलब्ध झाली आहे.

सद्यस्थितीत विमानतळाच्या इमारतीचे नवीनीकरण करण्यात आले आहे. विमानतळ औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून 10 कि.मी. अंतरावर आहे.

जिल्ह्यातील प्रमुख पिके :

शेती हा पारंपरिक तसेच आधुनिक असा व्यवसाय असून त्यामध्ये निरंतर बदल होत असतात. शेतीमध्ये सुध्दा इतर व्यवसायांप्रमाणे असणारी स्पर्धा तसेच बदलती सामाजिक-आर्थिक परिस्थिती यास अनुसरून पिके, पिक व्यवस्था, प्रक्रिया व पणन यांमध्ये शेतकरी व कृषी क्षेत्रातील व्यावसायिक सतत सुधारणा करत असतात.  त्यामध्ये प्रामुख्याने कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, ज्वारी, गहू इत्यादी पिके घेतली जातात.

संभाजीनगर नामांतर :

शिवसेना प्रमुख स्वर्गिय श्री बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराचे नाव संभाजीनगर व्हावे अशी ईच्छा व्यक्त केली होती आणि त्यांनी या शहराला संभाजीनगर नाव दिलेलेच आहे. पण ते सरकारी स्तरावर कार्यवाहीत आले नाही.

विभागीय आयुक्तांकडे नामांतराबाबतचा प्रस्तावही पाठवण्यात आला आहे असे दिसून् येते. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या कडून अधिकृत लेटरहेडवरच आता संभाजीनगरचा अधिकृतपणे उल्लेख केला जात आहे. मात्र संभाजी नगर असे नामांतर करण्याला काँग्रेस पक्षाने विरोध केल्याचे दिसून येते.

प्रेक्षणीय स्थळ :

औरंगाबाद जिल्ह्यात अनेक प्रेक्षणीय तसेच ऐतिहासिक स्थळे पर्यटकांना आकर्षित करत असतात तर ते कोणते स्थळ आहेत ते आपण पाहूया.

अजिंठा-वेरूळ लेण्या :

5 व्या तसेच 8 व्या शतकात या लेण्या गुफेत साकारण्यात आलेल्या आहेत.

दौलताबाद किल्ला :

मोहम्मद तुघलकाची राजधानी या ठिकाणी होती.

खुलताबाद :

या शहरात मुघल बादशाहा औरंगजेबाची कबर आहे.

बीबी का मकबरा :

बेगम राबीयाची म्हणजेच बादशहा औरंगजेबाच्या पत्नीची कबर येथे आहे. ताजमहलची ही प्रतिकृती आहे.

घृष्णेश्वर मंदीर :

हे बरा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजेच बारावे ज्योतिर्लिंग आहे.

पाणचक्की

पैठण :

हे संत एकनाथ यांचे गाव आहे. येथे मोठी संत परंपरा तुम्हाला दिसेल.

जायकवाडी धरण

औरंगाबाद गुफा आणि औरंगाबाद लेणी 52 दरवाजे.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

FAQ

औरंगाबाद मध्ये काय प्रसिद्ध आहे?

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, बीबी का मकबरा, पाणचक्की, सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय याच जिल्ह्यात आहेत. 

औरंगाबाद हे नाव कसे पडले?

अहमदनगर सल्तनतचे मलिक अंबर याच्यानंतर त्याचा मुलगा फतेह खान यांनी नाव बदलून फतेहनगर केले.

औरंगाबादमध्ये किती तालुके आहेत?

प्रशासकीयदृष्ट्या, जिल्ह्यात 1362 गावे आहेत आणि 9 तालुक्यांमध्ये विभागले गेले आहे, जे 5 उपविभागांमध्ये विभागले गेले आहेत: औरंगाबाद.

औरंगाबादचे महत्त्व काय?

हे शहर कापूस कापड आणि कलात्मक रेशीम कापडांचे प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून ओळखले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासह अनेक नामवंत शैक्षणिक संस्था शहरात आहेत.

औरंगाबादचे सध्याचे नाव काय आहे?

महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचे ‘धाराशिव’ असे नामांतर करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment