Best Subhash Chandra Bose Quotes In Marathi सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. हे नेताजी या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला जय हिन्द चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस चे अनमोल सुविचार Best Subhash Chandra Bose Quotes In Marathi
अन्यायाशी तडजोड करणे हे सर्वात मोठे पाप आहे.
आमच्या सार्वत्रिक जीवनाचा आदर्शभूत पाया न्याय, समता, स्वातंत्र्य, शिस्त आणि प्रेम हा असावा.
कष्ट आणि सेवा यातच खरा आनंद आहे, जे दुसऱ्यासाठी झटतात त्यांनाच खऱ्या आनंदाचा आस्वाद घेता येतो.
जाती संस्थेचे निर्मुलन करा, जातीभेद, धर्मभेद यांना काहीही अर्थ नाही.
जीवन म्हणजे सुखद शय्या नसून एक समरभूमी आहे.
डोळ्यात आशेचे स्वप्न, हातात मृत्यूचे फुल आणि अंत:करणात स्वातंत्र्याचे वादळ हाच खरा क्रांतिकारकाचा बाणा आहे.
तात्पुरत्या पराभवाने दाबून खचून जाऊ नका.
तुमची प्रेरणा, तुमची चेतना साजिवंत ठेवा.
भिक मागून कधीनी कोणाला स्वातंत्र्य प्राप्त करता येणार नाही, ते ताकदीनेच मिळवले पाहिजे, आणि त्याची किंमत रक्त ही आहे.
मरावे कसे हे निश्चित करा म्हणजे जगावे कसे हे शिकाल.
व्यक्तीच्या त्यागातूनच राष्ट्र उभे राहत असते.
सदा सर्वदा आनंदित रहा.
सर्व प्रकारच्या अंध श्रद्धा आणि धर्माच्या नावाखाली केला जाणारा वेडाचार नष्ट करा.
Subhash Chandra Bose Quotes In Marathi तुम्हाला कसे वाटले याबद्दल आम्हाला जरूर कळवा .
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
Essay On Metro Rail In Marathi
Essay On World Wildlife Day In Marathi
My Country India Essay In Marathi